शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भय्यू महाराज यांचे आदर्श विचार जोपासणे हीच त्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:54 IST

राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

ठळक मुद्देमाने-कदम : संगममाहुली येथे अस्थीकलशाचे विसर्जन

सातारा : ‘राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. मात्र ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे महान सामाजिक कार्य, आदर्श विचार आपल्यात कायमच राहतील. त्यांचे विचार व सामाजिक कार्य अधिक गतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा माने-कदम यांनी केले.

भय्यू महाराज यांच्या अस्थीकलशाचे सातारा येथील संगम माहुली येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. चंद्र्रशेखर घोरपडे, रणजित देशमुख, बाबूराव शिंदे, संतोष जाधव, गणेशचंद्र पिसाळ, रविराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘भय्यू महाराज हे विचारांचे व्यासपीठ होते. त्यांच्या विचारांनी आज देशभरात आमच्यासारखे लाखो तरुण कार्यरत आहेत. त्यांचे विचार जोपासणे व वाढविणे हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.’ बाबूराव शिंदे म्हणाले, ‘एकाच व्यक्तीच्या ठायी असे अनंत सद्गुण असणाऱ्या या राष्ट्रसंताला आज आपण मुकलो आहोत. त्यांची लोकांवर व लोकांची त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही अफाट आहे. त्यांच्या विचारांचे व आदर्शाचे कायमच जतन व्हावे.’यावेळी गणेशचंद्र पिसाळ, संतोष जाधव, सुशांत निंबाळकर, सुजित आंबेकर, रणधीर जाधव आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

असा सामाजिक संत होणे नाही..भय्यू महाराज यांचे सामाजिक कार्य अफाट आहे. अनेक पिढ्यांना आदर्शवत काम दाखविणाºया या व्यक्तिमत्त्वाचे असे आकस्मिक जाणे हे मनाला न पटणारे आहे. देशासाठी ही एक प्रचंड मोठी सामाजिक हानी ठरली आहे. असा सामाजिक संत यापुढे होणे नाही. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.- श्रीनिवास पाटील, राज्यपाल (सिक्कीम)